महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेची मुदत पुन्हा एकदा वाढविली आहे. यापूर्वी ही अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली होती.
तथापि, राज्यातील काही भागांत नैसर्गिक आपत्ती, पूरस्थिती किंवा इतर प्रतिकूल परिस्थितींमुळे अनेक महिलांना वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आलेली नव्हती. काही लाभार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या पती किंवा वडिलांच्या निधनानंतर संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी मिळण्यातही अडचणी येत असल्याने त्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित राहिले होते.
या सर्व अडचणींचा विचार करून आणि कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारचा हा निर्णय दुर्बल व वंचित घटकांना मदत करणारा ठरणार असून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मोठी दिलासा देणारा मानला जात आहे. पात्र लाभार्थींनी या मुदतीपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ अखंडितपणे मिळवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Source : https:devendrafadnavis.in
GR : Download
